'अभिनंदन ! तुम्ही पाच कोटी जिंकले आहात !' कोरोना संकटातून बचावलेल्या ठाण्याच्या राजकांत यांच्यावर नशीब फळफळले !
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
ठाणे, (प्रबोधन न्यूज) - बहुतांशी लोकांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या खिळखिळे करुन सोडणाऱ्या कोरोनाच्या प्रकोपातून वाचण्याचा सर्वजण प्रयत्न करत असतात. कोरोनाबाधित होऊन उपचार घेऊन सुखरूप घरी परत आलेल्या राजकांत पाटील यांनाही आर्थिक झालं सोसावी लागली होती. पुढे काय ?या विवंचनेत असणाऱ्या राजकांत यांना जेव्हा 'तुमचे अभिनंदन ! तुम्ही पाच कोटी जिंकले आहात !' असा फोन आला, तेव्हा त्यांना काय उत्तर द्यावे, सुचेना. मात्र, जेव्हा आपण लॉटरी खरेदी केली होती, याची आठवण झाल्यावर त्यांनी अचानक फळफळलेल्या नशिबाचे आभार मानले.
ठाणे जिल्ह्यातील दिवा भागात राहणाऱ्या राजकांत पाटील या व्यापारी आणि लघु व्यावसायिकाने डियर लॉटरीज बैसाखी बंपर 2021 ड्रॉ जिंकत तब्बल 5 कोटी रुपयांची रक्कम मिळवली आहे. विशेष म्हणजे पाटील नुकतेच कोरोनावरील उपचार घेऊन घरी आले होते. कोरोनामुळे भविष्याची चिंता असल्यामुळे सर्वांच्याच मनात सतत धाकधूक सुरु आहे. अशा कठीण काळात डियर लॉटरीने पाटील यांच्या विश्वासाला पुन्हा उभारी देत आयुष्यात सकारात्मकता निर्माण केली.
‘नमस्कार पाटील साहेब. तुम्ही डियर लॉटरी टीमच्या इतर 25 सदस्यांसह कॉन्फरन्स कॉलवर आहात आणि आम्ही तुमचे अभिनंदन करतो कारण तुम्ही 5 कोटी रुपये जिंकलेले आहात’ असं त्यांनी फोनवर सांगताच काही क्षण मी गांगरलो आणि हे खरंच घडलं आहे याची जाणीव झाल्यावर आनंदाने तोंडातून शब्द फुटत नव्हते' अशी प्रतिक्रिया डियर लॉटरीज बैसाखी बंपर 2021 चे मानकरी ठरलेल्या राजकांत पाटील यांनी दिली.
या लॉटरी तिकिटांची किंमत अवघ्या सहा रुपयांपासून सुरु होते. समाजातील प्रत्येक व्यक्ती यामध्ये सहभागी व्हावा हाच या मागचा हेतू असल्याचे कंपनीने सांगितले आहे. सध्याच्या कठीण काळामध्ये, या महामारीला तोंड देताना, लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, पगार कमी झाले आहेत. अशा स्थितीत नवीन आशा बाळगणे आणि स्वत:ला धीर देणे कठीण होऊन बसले आहे. म्हणूनच डियर लॉटरी आपल्या मजेशीर स्पर्धांच्या माध्यमातून लोकांना नशिबावर विश्वास ठेवण्यास आणि आपलेही भविष्य कधीतरी बदलेल अशी आशा बाळगण्यास प्रोत्साहित करत आहे.